Nashik Psychiatric Society

Author name: Nashik Psychiatric Society

Uncategorized

Misconceptions About Mental Illness in India

Misconceptions About Mental Illness in India: Time to Break the Myths Mental health problems are common in India, but stigma and wrong beliefs often stop people from seeking timely help. These misconceptions sometimes cause more harm than the illness itself.One common myth is that mental illness is rare. Research shows that 1 in 7 Indians may face a mental health condition during their lifetime. These include depression, anxiety, addictions, schizophrenia, and bipolar disorder. Another belief is that mental illness means weakness or poor upbringing. People are often told “just be strong” or “the mind is weak”. In truth, psychiatric illnesses are medical conditions, linked to brain changes, genetics, and stress—not a matter of willpower or family background.Medicines too are misunderstood. Many think psychiatric tablets cause addiction. This is untrue. Most medicines are safe and not habit-forming. Some must be taken long-term, just like medicines for diabetes or high blood pressure, but that does not mean dependence.Cultural misconceptions also play a role. Some families believe marriage will “cure” illness, or that prayers, rituals, or faith healing alone are enough. While spiritual practices, yoga, and meditation may support recovery, treatment with medicines or therapy is often necessary. Another myth is that children cannot have mental health problems. In reality, stress, depression, and even self-harm are increasingly seen in young people. Early help can change their future.ECT is one of the most misunderstood treatments. In movies it is often shown as painful and cruel, which is far from reality. In truth, ECT is safe and effective when used for severe illnesses like depression or schizophrenia. A) “It is given without anaesthesia.”- Not anymore. ECT is done under anaesthesia, so the person is asleep and does not feel pain. B) “It damages the brain.” – It does not cause brain damage. Some may have short-term memory issues, but these usually improve. C) “It is a punishment.” – ECT is never used as punishment. It is given when someone is very unwell and needs quick recovery. D) “It is outdated.”- ECT is still one of the fastest and most effective treatments, helping many return to normal life.The harshest misconception is that life ends with a diagnosis. The truth is that with proper treatment, most people study, work, marry, and live fulfilling lives. Many Indians—including public figures—have spoken about their struggles, proving that recovery is possible. Modern psychiatric hospitals too are misunderstood. They are no longer places of punishment, but centers of respectful, compassionate care.Talking about mental health does not worsen the problem—staying silent does. By replacing myths with facts, families can fight stigma and give their loved ones dignity, support, and hope for recovery.

Uncategorized

Electroconvulsive Therapy (ECT)

Electroconvulsive Therapy (ECT): Beyond the Fear of “Shock Treatment” The phrase “shock treatment” has long carried negative associations. Films and media portrayals have created an image of pain, fear, and punishment. In reality, modern Electroconvulsive Therapy (ECT) is one of the most effective and safest treatments available in psychiatry today.ECT is recommended in situations— for example severe depression with suicidal thoughts, psychotic states where the person has stopped eating or communicating, or bipolar disorder with uncontrollable aggression. In such conditions, waiting weeks for medicines to work can be life threatening. ECT provides faster improvement, sometimes within days, and can even save lives.The procedure is highly controlled and takes place in a hospital under specialist supervision. Patients receive short-acting anesthesia and muscle relaxants, ensuring they are completely unconscious and comfortable. A small, regulated electrical current is then applied to the brain to produce a brief, controlled seizure lasting less than a minute. The patient feels no pain and has no memory of the procedure. The entire process lasts only a few minutes, after which the patient wakes up safely.Modern ECT is safe and effective. Temporary side effects such as headache, body ache, or short-term memory problems may occur but generally settle within days. Serious complications are very rare. ECT is often tolerated well by older adults and even by those with medical illnesses, making it a versatile treatment option. Crucially, India’s Mental Healthcare Act (2017) mandates that ECT can be administered only with informed consent, ensuring that patient rights and dignity are fully respected.Families often observe meaningful changes within a few sessions: a withdrawn patient may begin talking again, someone refusing food may start eating, and mood and sleep may improve rapidly. For many, this brings new hope after months of distress.ECT is not punishment, not proof of “madness,” and not a measure of last resort. It is a medical treatment, backed by decades of research and clinical experience. By dispelling outdated myths and presenting the facts, families can make informed choices without fear or hesitation.Electroconvulsive Therapy remains one of the most effective tools in psychiatry, offering rapid relief when time is critical. With modern techniques, strict safety standards, and respect for patient consent, ECT restores not only health but also dignity and hope. Understanding its true role allows us to see it not as a source of fear, but as a pathway to recovery..

Uncategorized

मानसशास्त्र – काल आज आणि उद्या

मानसशास्त्र – काल आज आणि उद्या डॉ. शिरीष सुळेमानसशास्त्र किंवा त्या आधी माणसाचे मन व त्याच्या व्यक्त होण्याच्या पद्धती या शरिरापासून वेगळ्या आहेत असे सिद्धांत साधारण १७ व्या शतकात मांडले गेल्याचे पुरावे सापडतात. यातूनच हळूहळू मानसशास्त्र या एक संपूर्णपणे स्वतंत्र शास्त्राचा जन्म झाला. १८७९ साली जर्मनी मध्ये जगातील सर्वात प्रथम मानसशास्त्रीय प्रयोगशाळा उघडण्यात आली. यामुळे मानसशास्त्रला विज्ञानाचे पाठबळ मिळाले व अनेक प्रयोग सुरु झाले. तेंव्हापासून आजपर्यंत अनेक विचारवंतांनी त्यांचे विचार मांडून विविध विचारधारांचा जन्म झाला.१९ व्या शतकाच्या सुरुवातीला मनोविकृतीशास्त्र म्हणजेच सायकिऑस्ट्रीचा जन्म झाला. यामुळे माणसाच्या वागण्यातील बदल हे आजार असू शकतात व त्यावर उपचार होऊ शकतात हे सिद्ध झाले. पण त्या काळात देखील पुराव्यांच्या अभावी या शास्त्राबद्दल आणि त्याचा वापर करणाऱ्या डॉक्टरांविषयी अनेक गैरसमज निर्माण झाले व ते आजतागयत थोड्याफार फरकाने सामान्य माणसाच्या मनात आजही घर करून आहेत.भारतामध्ये सर्वप्रथम मेंटल हॉस्पिटल हे मुंबई मद्ये सुरु करण्यात आले. त्या पाठोपाठ NIMHANS बेंगलुरची स्थापना झाली. भारतीय मासोपचार संघटनेची स्थापना भारतभरातील मूठभर मानसोपचारतज्ञांनी एकत्र येऊन केली व भारत सरकार तर्फे १९८७ साली मानसिक आरोग्य कायदा बनवण्यात आला.सुरुवातीला भारतामध्ये मोठी शहरं वगळता मानसोपचाराचा अभाव होता. त्यामुळे अनेक रुग्णांना मदत मिळायला उशीर होत असे किंवा नेणे शक्य नसल्यास त्यांच्यावर कधी उपचारच होत नसे. औषधोपचारापेक्षा देवाधर्माकडे जास्त कल असल्याने बाहेरचे बाबा बुवांचे उपचार केले जात. त्यामुळे मानसिक आजारांचे मूळ हे भूतबाधा, हवा टाकणे वा मंतरल्यामुळे होत असल्याचा लोकांना विश्वास वाटू लागला. या बरोबरच पेशंटचे होणारे हाल पण वाढू लागले. त्यांना कोंडून ठेवणे, बांधून ठेवणे, देवाधर्माच्या ठिकाणी साखळदंडाने बांधणे हे उपचार म्हणून केले जात असे. या रुग्णांना जेव्हा औषधोपचाराचा फायदा जाणवू लागला तेव्हा हळूहळू लोकांचा कल हा डॉक्टर आणि दवाखान्याकडे वळायला लागला.पूर्वी उपचारासाठी उपलब्ध असलेली औषधे देखील खूप मर्यादित होती. पण गेल्या ५० वर्षात अनेक प्रकारच्या नवीन औषधांचा व उपचार पद्धतीचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. आजकाल तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या औषधांसोबतच इंजेक्शन वाटे देण्यासाठी देखील अनेक औषधे उपलब्ध आहेत. महिन्यातून, पंधरा दिवसातून एकदा इंजेक्शन वाटे औषध शरीरामद्ये सोडता येते असही तंत्रज्ञान आता उपलब्ध झाले आहे. पूर्वापार चालत आलेल्या विद्वयत उपचारपद्धतीमध्ये देखील खूप बदल झाला आहे. त्यामुळे त्याचे होणारे दुष्यपरिणाम अगदी नगण्य झाले आहेत. त्याच बरोबर मेंदूला रसायने बनविण्यासाठी उद्युक्त करण्याकरता RTMS/TCDS हे उपचार आता पाश्च्यात्य देशांमद्ये आणि भारतातील काही मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध झाले आहेत. या पुढे Artificial Intelligence चा वापर करून आणि तंत्रज्ञानाच्या आधारे fMRI सारख्या Tests करून माणसाच्या वागण्यामागचे अर्थ आणि भावना याचीही माहिती मिळू शकेन.५० वर्षांपूर्वी मानसिक आजार म्हणजे वेड लागणे एवढाच समज होता त्यामुळे मानसरोगतज्ञांची ओळख फक्त वेड्यांचे डॉक्टर अशीच होती. आजारी व्यक्तींना सांभाळण्यासाठी साखळ्या, दोरखंडांचा वापर सर्रास केला जात असे व नाईलाजास्तव डॉक्टरकडे आणले जात असे. मानसिक आजार म्हणजे कलंक मानले जायचे. म्हणूनच आम्हा मानसरोगतज्ञांना समाजात वावरतांना काही नियम पाळावे लागत. कुठल्याही व्यक्तीने कार्यक्रमात ओळख दाखवल्याशियाय आपण ओळख दाखवायची नाही. पेशंट रात्री अंधार झाल्यावर दवाखान्यात येत असत. डॉक्टरांबद्दल पण अनेक गैरसमज होते – डॉक्टर सम्मोहन करतात, बाहेरची विद्या जाणतात इत्यादी पण आता चित्र बदलले आहे.

Uncategorized

मानसशास्त्रीय चाचण्या व त्याचे महत्व

मानसशास्त्रीय चाचण्या व त्याचे महत्व डॉ. ऋचा सुळे खोतबऱ्याच वेळेला मानसशास्र्ज्ञ किंवा मानसोपचार तज्ञाकडे गेल्यावर सल्ला दिला जातो कि आपण आधी पेशंटची मानसशास्त्रीय तपासणी किंवा Psychometric Test करून घेऊया. या चाचण्या म्हणजे नक्की काय असतात? त्याचा उपयोग कसा होतो? त्या करण्यामागचे फायदे काय हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. मानसशास्त्रीय चाचण्या ह्या एखाद्या व्यक्तीच्या मानसिकतेची व वागण्या बोलण्याची तपासणी करणाऱ्या संरचित व प्रमाणीत केलेल्या प्रश्नांचा संच असतो. सहसा या तपासण्या ‘हो’ ‘नाही’ आशी उत्तरं असणारे प्रश्न विचारतात. आपल्याला येणाऱ्या अनुभवाप्रमाणे आपण यांचे उत्तर प्रामाणिकपणे देणे अपेक्षीत असते. या चाचण्यांमध्ये व्यक्तीचा स्वभाव, बुद्धीमत्ता, भावना, नैसर्गिक क्षमता व कार्य कौशल्य यांचे मोजमाप केले जाते. त्याच बरोबर काही प्रकारच्या मानसिक आजारांची जडण झाली असल्यास त्याचा अंदाज देखील या तपासावाटे लावता येतो. या चाचण्या प्रशिक्षीत मानस शास्त्रज्ञांद्वारे दिल्या जातात. त्याचे विश्लेषण केले जाते व त्यातून तयार झालेला अहवाल समजावून सांगितला जातो. याच बरोबर या पुढे उपचारासंदर्भात कोणता मार्ग योग्य असेल याचा देखील सल्ला दिला जातो.मानसशास्त्रीय चाचण्यांचे प्रकार १. बुद्धिमत्ता चाचण्या (Intelligence tests) – व्यक्तीच्या वयानुसार व शिक्षणानुसार या केल्या जातात Eg – BKT, WAIS, WISC, VSMS etc.२. स्वभाव चाचण्या (Personality tests) – व्यक्तीच्या स्वभावाचे वैशिष्ठ ओळखणाऱ्या चाचण्या Eg – MMPI, MCMI.३. क्षमता व कार्य कौशल्य चाचण्या (Aptitude tests) – व्यक्तीच्या कार्यक्षमता व योग्य व्यवसाय निवडायला मदत करणाऱ्या चाचण्या .४. न्युरोसायकॉलॉजिकल चाचण्या – व्यक्तीच्या संज्ञानात्मक (DAT) क्षमता व मेंदूचे कार्य तपासणाऱ्या चाचण्या WAIS, MMSE५. प्रोजेक्टीव चाचण्या – काही संदिग्ध (ambiguous) चित्रांवर व्यक्तीचे मत जाणून घेऊन त्याच्या अंतरमनाला उलगडण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाचण्या Eg – ROR, TAT, CAT.मानसशास्त्रीय चाचण्यांचे महत्त्व१. वैद्यकीय निदान – या चाचण्यांवाटे व्यक्तीच्या आजाराची पुष्टी केली जाऊ शकते ज्यामुळे डॉक्टरांना किंवा सायकॉलॉजिस्टला पुढच्या उपचारासंदर्भात निर्णय घेणे सोपे जाते .२. विशेष शैक्षणिक गरज ओळखण्यासाठी – या चाचण्यावाटे एखाद्या विध्यार्थाच्या विशेष गरजा ओळखल्या जाऊ शकतात जसे कि – Learning disability, Slow learner व त्या प्रमाणे त्याचा शिक्षणात त्याची मदत केली जाऊ शकते.३. योग्य नौकरची निवड व करियर चे नियोजन – या चाचण्या व्यक्तीचा स्वभाव व क्षमता याची योग्य मेळ घालून कोणता नौकरी व्यवसाय निवडावा ज्यामध्ये व्यक्तीला आपल्या पूर्ण क्षमतांचा वापर करता येईल हे शोधण्यासाठी मदत करतात.४. कधीकधी कायद्याच्या अडचणींमध्ये देखील या चाचण्यांची मदत घेतली जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीची मानसिक योग्यता, गुन्हेगारी वृत्ती दाखवण्यासाठी कोर्ट देखील या चाचण्यांचे आदेश देऊ शकते.५. शlरत्रज्ञांना मनुष्य स्वभावाचे अनेक पैलू उलगडण्यासाठी व विविध सिद्धांत तपासण्यासाठी देखील मानसशात्रीय तपासण्यांचा फायदा होतो.६. एखाद्या व्यक्तीला आपल्या स्वभावाचे वा वागण्याचे विश्लेषण करून स्वयंसुधारणा करायची असेल अथवा आपली नेतृत्व क्षमता वाढवायची असल्यास देखील या चाचण्यांचा फायदा होतो.

Uncategorized

लैंगिक आरोग्य : गुप्ततेपासून जागरूकतेकडे

लैंगिक आरोग्य : गुप्ततेपासून जागरूकतेकडे डॉ. हेमंत सोननीसमानसोपचार तज्ञ नाशिक शारीरिक संबंध, लैंगिक समस्या हा आपल्याकडे मुळातच कमीत कमी बोलला जाणारा, कमीत कमी चर्चा केला जाणारा विषय. शाळेत शिक्षकांना, घरात मोठ्यांना, मुलांशी या विषयावर बोलताना नेहमीच अडचण येते, असा अनुभव आहे. त्यामुळे सर्वजण आपापल्या परीने पूर्वी इकडून तिकडून मित्र–मैत्रिणींकडून ऐकून, काहीतरी पुस्तक वाचून, आजकाल इंटरनेटवर, यूट्यूबवर, गूगलवर बघून याबद्दल काही ना काही माहिती मिळवत असतात. बऱ्याचदा अनधिकृत अशा या माध्यमातून मिळालेली माहिती ही चुकीची असते, गोंधळात टाकणारी असते. आणि त्यामुळे अनेक जणांना लैंगिक जीवनाबद्दल योग्य शास्त्रीय माहिती मिळालेली नसते. तसेच हा विषय जीवनाचा मूलभूत भाग आहे. जशा आपल्या इतर सर्व जबाबदाऱ्या आहेत, गरजा आहेत, तशी ही पण एक गरज आहे, जबाबदारी आहे; हा संदेश घरातल्या मोठ्यांकडून, समाजातल्या महत्त्वपूर्ण घटकांकडून वाढत्या वयात बऱ्याचदा मुला –मुलींना दिला जात नाही. त्यामुळे चुकीची माहिती किंवा गैरसमज किंवा अज्ञान मोठ्या प्रमाणात दिसते. आमच्याकडे येणाऱ्या बहुतेकशा लोकांमध्ये आम्ही ज्या लैंगिक समस्या बघतो त्यामध्ये ही मुख्य कारणे दिसतात. एकदा माझ्याकडे एक आयटी कंपनीत काम करणारे इंजिनिअर जोडपं आलं होतं. असे काही जोडपे आधीही आलेली आहेत की, सज्ञान, सुशिक्षित, बाकी सगळं कळत पण प्रत्यक्षात शारीरिक संबंध कसे ठेवायचे हेच दोघांपैकी एका जोडीदाराला माहिती नसतं किंवा दोघांनाही माहिती नसतं. आणि बऱ्याचदा वंध्यत्व उपचार घेण्यासाठी जेव्हा ते स्त्रीरोग तज्ञांकडे जातात तेव्हा अशा एक–दोन स्त्रीरोग तज्ञांनी माझ्याकडे असं एक जोडपं गेल्या काही दिवसात पाठवलेलं मला आठवतंय. दुसऱ्या बाजूला किशोरवयीन पिढी, तंत्रज्ञानाच्या भस्मासुरासारख्या प्रभावाखाली , किंवा peer pressure मध्ये , एकमेकांचे अनुकरण करत, खूप वेगळ्या प्रकारे लैंगिक जीवनात गुंतलेली दिसते. त्यामध्ये असुरक्षित शारीरिक संबंध, एकावेळी अनेक संबंध ठेवणे हे प्रकार दिसतात. पुरेशी काळजी घेतली जात नाही. गुंतागुंत होते, अनपेक्षित गर्भधारणा राहते. असे बरेच विषय दिसतात. लिंगात ताठरता येत नाही म्हणून घटस्फोट झाल्यानंतर दुसरं लग्न करायची वेळ येते, त्यावेळी आमच्याकडे उपचारासाठी आलेली उदाहरणे आहेत. ही बहुतेक उदाहरणं सांगण्याचं कारण म्हणजे, यामध्ये आमच्याकडे येणाऱ्या किंवा समाजात दिसणाऱ्या लैंगिक समस्यांपैकी ९९% या मानसिक स्वरूपात उत्पन्न झालेल्या असतात. आणि त्यावर बहुधा १०० % इलाज असतो. पुरुषांमध्ये सर्वात सामान्य समस्या म्हणजे Erectile Dysfunction – लिंग शिथिलता (ताठरता न येणे). काही अभ्यासांनुसार १५ ते २० टक्के पुरुष या विकाराने त्रस्त आहेत. यामुळे पुरुषाला संभोगावेळी पुरेशी उर्जा मिळत नाही. दुसरी महत्त्वाची समस्या म्हणजे Premature Ejaculation – अति लवकर वीर्यस्खलन, जी सुमारे ८–१० टक्के पुरुषांमध्ये आढळते. त्याशिवाय अनेक पुरुषांना कामेच्छा कमी होणे हा देखील त्रास जाणवतो. गैरसमज आणि अज्ञान खूप आहे. “वीर्य कमी झाले” , अति प्रमाणात शारीरिक संबंध ठेवल्याने किंवा हस्तमैथुन केल्याने अशक्तपणा आला, लघवी वाटे वीर्य बाहेर पडल्याने थकवा आला असे अनेक गैरसमज मोठ्या प्रमाणावर दिसतात. अशा गैरसमजुतींमुळे मानसिक ताण आणि अपराधीपणाची भावना वाढताना दिसते, न्यूनगंड निर्माण होतो. महिलांमध्ये सर्वात जास्त दिसणारी समस्या म्हणजे कामेच्छेचा अभाव. काही संशोधनानुसार सुमारे २० ते २५ टक्के महिलांना ही अडचण भासते. त्याशिवाय काहींना संभोगावेळी वेदना, आनंद न मिळणे, किंवा शारीरिक उत्तेजना कमी होणे अशा समस्या दिसतात. या विकारांवर उघडपणे चर्चा न झाल्यामुळे अनेक महिला शांतपणे त्रास सहन करतात. मानसिक ताण, नैराश्य, नात्यातील तणाव, चुकीच्या समजुती, व्यसनाधीनता या गोष्टींमुळेही लैंगिक विकार विकार वाढतात. भारतात अजूनही लैंगिक शिक्षण कमी असल्यामुळे लोकांना योग्य माहिती मिळत नाही. लैंगिक विकार होणे यात लज्जास्पद असे काही नाही. हे आजार इतर आरोग्याच्या समस्यांप्रमाणेच उपचाराने सुधारू शकतात. त्यामुळे समस्या असल्यास युरोलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा मानसोपचारतज्ज्ञ यांच्याशी नक्की संपर्क साधावा. लैंगिक आरोग्य हीसुद्धा आरोग्याचीच एक महत्त्वाची बाजू आहे. योग्य वेळी उपचार घेतल्यास बहुतेक समस्या दूर होऊ शकतात. त्यासाठी विविध प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. ही औषधे विज्ञानाच्या संशोधनातून निर्माण झालेली आहेत. Viagra सारखी गोळी सर्वसामान्यांना परिचित आहे. तसेच विविध प्रकारच्या मानसोपचार पद्धती/ समुपदेशन, जीवनशैलीतले बदल जसे की व्यायाम, खेळ, क्रीडा, कला, पुरेशी झोप अशी निरोगी जीवनशैली या सर्व गोष्टी आपल्याला लैंगिक जीवन सक्रिय ठेवण्यास मदत करतात. व्यसनांपासून दूर राहणे आणि उघड संवाद यामुळेही मोठा फायदा होतो. त्यामुळे चुकीच्या स्रोतापासून माहिती घेण्याऐवजी या विषयावर कोणतीही समस्या वाटल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. डॉ. हेमंत सोननीसमानसोपचार तज्ञ नाशिक

Uncategorized

मनातला संघर्ष:सामान्य मानसिक आजारांची माहिती

मनातला संघर्ष: सामान्य मानसिक आजारांची माहिती,लक्षणे आणि उपलब्ध उपचार आजच्या वेगवान जीवनात, शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे. मानसिक विकारांकडे दुर्लक्ष केल्यास ते गंभीर रूप धारण करू शकतात, ज्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. मानसिक विकारांबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्यांना समजून घेणे आवश्यक आहे, जेणेकरून योग्य वेळी मदत घेता येईल. प्रमुख मानसिक विकार आणि त्यांची लक्षणे नैराश्य (Depression)नैराश्य हा एक सामान्य पण गंभीर मानसिक विकार आहे. तो केवळ तात्पुरता मूड खराब होणे नव्हे, तर एक अशी स्थिती आहे, ज्यामुळे व्यक्तीच्या विचार, भावना आणि वागण्यावर दीर्घकाळ परिणाम होतो.• लक्षणे:• सतत उदास किंवा निराश वाटणे.• कोणत्याही गोष्टीत रस न वाटणे किंवा आनंद न मिळणे.• झोपेच्या पद्धतीत बदल (जास्त झोप लागणे किंवा झोप न लागणे).• वजनामध्ये लक्षणीय बदल.• सतत थकवा जाणवणे किंवा ऊर्जा कमी वाटणे.• एकाग्रता साधण्यात अडचण.• स्वतःबद्दल नकारात्मक विचार किंवा अपराधी भावना.• आत्महत्येचे विचार येणे (हे एक गंभीर लक्षण आहे, अशा वेळी त्वरित मदत घ्यावी). (Bipolar Mood Disorder)हा विकार दोन टोकाच्या मनस्थितीमुळे ओळखला जातो: तीव्र उत्साह (Mania) आणि नैराश्य (Depression). व्यक्तीच्या मूडमध्ये मोठे आणि अचानक बदल होतात.• तीव्र उत्साहाची लक्षणे (Mania):• खूप आनंदी किंवा उत्साही वाटणे.• झोप कमी लागणे पण ऊर्जा जास्त असणे.• खूप वेगाने बोलणे किंवा विचार करणे.• धोकादायक किंवा बेजबाबदार निर्णय घेणे (उदा. जास्त खरेदी करणे किंवा पैसे उधळणे).• नैराश्याची लक्षणे (Depression):• नैराश्याच्या लक्षणांसाठी कृपया वरील नैराश्याच्या भागाचा संदर्भ घ्या.स्मृतिभ्रंश (Dementia)डिमेन्शिया म्हणजे स्मृती, विचार आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये घट, ज्यामुळे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. अल्झायमर रोग हा डिमेन्शियाचा सर्वात सामान्य प्रकार आहे.• लक्षणे:• अलीकडच्या घटना विसरणे.• भाषा आणि संवाद साधण्यात अडचणी येणे.• व्यक्तिमत्त्वात बदल होणे.• पैसे किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी हाताळण्यात अडचण.• निर्णय घेण्यात गोंधळ होणे. चिंता विकार (Anxiety Disorders)चिंता विकार म्हणजे एखाद्या गोष्टीची अनावश्यक किंवा जास्त भीती वाटणे. ही भीती सामान्य नसून व्यक्तीच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळा आणते.• लक्षणे:• सतत काळजी किंवा अस्वस्थता वाटणे.• हृदयाचे ठोके वाढणे किंवा छातीत धडधडणे.• श्वास घेण्यास त्रास होणे.• घाम येणे आणि थरथरणे.• सतत काहीतरी वाईट घडणार आहे अशी भीती वाटणे.• अनैसर्गिक भीती (उदा. गर्दीची भीती किंवा सार्वजनिक ठिकाणी जाण्याची भीती). स्किझोफ्रेनिया (Schizophrenia)स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर मानसिक विकार आहे, ज्यामुळे व्यक्तीचे विचार, भावना आणि वास्तव यांच्यातील संबंध बिघडतो. याला एक प्रकारचा ‘मनोविकार’ (Psychosis) असेही म्हणतात.• लक्षणे:• मतिभ्रम (Hallucinations): नसलेल्या गोष्टी ऐकू येणे, दिसणे किंवा वास येणे.• भ्रम (Delusions): चुकीच्या, अविश्वसनीय कल्पनांवर विश्वास ठेवणे (उदा. कोणीतरी माझ्या विरोधात कट रचत आहे).• अव्यवस्थित विचार आणि बोलणे.• सामाजिक एकांतवास किंवा भावनांची कमतरता.• दैनंदिन कामे करण्यात अडचण. व्यसन (Substance Use Disorders)व्यसन म्हणजे एखाद्या पदार्थाचे (उदा. दारू, ड्रग्स, सिगारेट) वारंवार सेवन करणे, ज्यामुळे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. हा एक प्रकारचा मानसिक विकार मानला जातो, कारण यामुळे मेंदूच्या कार्यावर परिणाम होतो.• लक्षणे:• पदार्थाचे जास्त प्रमाणात सेवन करणे किंवा सेवन थांबवू न शकणे.• सेवन न केल्यास शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता जाणवणे.• कुटुंबापासून दूर राहणे किंवा सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी न होणे.• कामावर किंवा शिक्षणात लक्ष न लागणे.• पदार्थ मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणे. अति-उत्साह (Attention-Deficit/Hyperactivity Disorder – ADHD)ADHD हा लहान मुलांमध्ये आढळणारा एक सामान्य विकार आहे, पण तो प्रौढांमध्येही दिसून येतो. यामुळे एकाग्रता साधणे आणि आवेग नियंत्रित करणे कठीण होते.• लक्षणे:• एकाग्रतेचा अभाव: कामावर लक्ष केंद्रित करू न शकणे, सहज विचलित होणे आणि गोष्टी विसरणे.• अति-उत्साह (Hyperactivity): सतत बेचैन वाटणे, एका जागी शांत बसू न शकणे, सतत हालचाल करणे.• आवेगात्मक वर्तन: विचार न करता बोलणे किंवा काम करणे, इतरांच्या बोलण्यात अडथळा आणणे. बौद्धिक अक्षमता (Intellectual Disabilities)याचा संबंध व्यक्तीच्या मानसिक क्षमतेशी असतो. यामध्ये व्यक्तीची शिकण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता सरासरीपेक्षा कमी असते. ही स्थिती जन्मापासून किंवा लहानपणी विकसित होते.• लक्षणे:• कमी वयात बोलण्यास किंवा चालायला शिकण्यास उशीर होणे.• शिकण्यात अडचणी येणे.• सामाजिक नियम समजून घेण्यात अडचण.• दैनंदिन कामे (उदा. कपडे घालणे, स्वतःची काळजी घेणे) करण्यात अडचण. ओबसेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD)ओबसेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD) हा एक मानसिक विकार आहे. यामध्ये व्यक्तीला काही विशिष्ट अनाहूत विचार (Obsessions) आणि ते विचार कमी करण्यासाठी वारंवार कराव्या लागणाऱ्या क्रिया (Compulsions) यांचा सामना करावा लागतो. OCD म्हणजे अशी स्थिती, जिथे व्यक्तीला अवांछित आणि त्रासदायक विचार, कल्पना किंवा प्रतिमा सतत मनात येतात. हे विचार खूप चिंता निर्माण करतात, ज्यामुळे ती व्यक्ती ती चिंता कमी करण्यासाठी काही विशिष्ट कृती वारंवार करते. ही कृती केल्यावर तिला तात्पुरता आराम मिळतो. • लक्षणे:• ऑब्सेशन्स (अनाहूत विचार): • स्वच्छता आणि जंतूंचा जास्तच विचार करणे.• एखादी वस्तू विशिष्ट क्रमाने किंवा सममितीमध्ये (Symmetry) नसली तर अस्वस्थ वाटणे.• काहीतरी वाईट घडेल अशी सतत भीती वाटणे (उदा. घरात चोरी होईल).• अवांछित धार्मिक किंवा लैंगिक विचार मनात येणे • कंपल्शन्स (वारंवार केल्या जाणाऱ्या कृती):• हात किंवा शरीर वारंवार धुणे.• काहीतरी तपासण्यासाठी परत परत पाहणे (उदा. दरवाजा लॉक आहे की नाही, गॅस बंद केला आहे की नाही).• गोष्टी विशिष्ट क्रमाने किंवा संख्येत ठेवणे.• काही विशिष्ट शब्द किंवा वाक्ये पुन्हा पुन्हा मनात म्हणणे.• उपचार:• कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT), एक्सपोजर अँड रिस्पॉन्स प्रिव्हेंशन (ERP), हा सर्वात प्रभावी उपचार आहे. यात रुग्णाला त्याच्या भीतीच्या विचारांना सामोरे जाण्यास शिकवले जाते आणि त्यातून निर्माण होणारी कृती टाळण्यास शिकवले जाते.• औषधोपचार: चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी SSRI सारखी औषधे दिली जातात. सोमाटोफॉर्म डिसऑर्डर (Somatoform Disorder)सोमाटोफॉर्म डिसऑर्डर हा असा विकार आहे जिथे व्यक्तीला शारीरिक वेदना किंवा लक्षणे जाणवतात, परंतु डॉक्टरांच्या तपासणीत त्यामागे कोणतेही ठोस वैद्यकीय कारण सापडत नाही. ही लक्षणे खोट्या नसतात, तर ती व्यक्ती ती खऱ्या अर्थाने अनुभवते.• सोमाटोफॉर्म डिसऑर्डर म्हणजे अशी स्थिती, जिथे मानसिक तणाव, चिंता किंवा इतर भावनिक समस्या शारीरिक लक्षणांच्या रूपात प्रकट होतात. हे लक्षणे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतात. • लक्षणे:• शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सतत किंवा तीव्र वेदना होणे (उदा. डोकेदुखी, पाठदुखी).• पोटाशी संबंधित समस्या (उदा. मळमळ, अतिसार).• थकवा किंवा अशक्तपणा.• हृदयाची धडधड वाढणे, छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे.• इतर कोणत्याही वैद्यकीय कारणाशिवाय शारीरिक कार्यक्षमतेत घट होणे (उदा. अर्धांगवायू किंवा दृष्टी कमी होणे).• उपचार:• कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT): या थेरपीमध्ये रुग्णाला त्याचे विचार, भावना आणि शारीरिक लक्षणांमधील संबंध समजून घेण्यास मदत केली जाते.• औषधोपचार: जर लक्षणांसोबत चिंता किंवा नैराश्य असेल, तर त्याचे उपचार करण्यासाठी औषधे दिली जातात.• इतर उपाय: योग, ध्यान आणि विश्रांती तंत्रांचा वापर करून तणाव कमी करण्यास शिकवले जाते. इंटरनेट गेमिंग ॲडिक्शनइंटरनेट गेमिंग ॲडिक्शन हा एक प्रकारचा व्यसन आहे जिथे व्यक्ती डिजिटल किंवा व्हिडिओ गेम्स खेळण्यावर आपले नियंत्रण गमावते. यामुळे तिच्या वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. • इंटरनेट गेमिंग ॲडिक्शन म्हणजे गेम्स खेळण्याची अशी सवय जी व्यक्तीच्या जीवनातील इतर महत्त्वपूर्ण गोष्टींवर वर्चस्व गाजवते. यामुळे व्यक्ती आपले अभ्यास, काम, सामाजिक संबंध आणि आरोग्य याकडे दुर्लक्ष करते. • लक्षणे:• खेळण्यावरील नियंत्रण गमावणे: खेळण्याची वेळ कमी करता न येणे.•

Uncategorized

मानसिक आरोग्य – भारत आणि पाश्चात्य देश

मानसिक आरोग्य – भारत आणि पाश्चात्य देश नमस्कार. एप्रिल २०२२ मध्ये मी नाशिक सोडून यू.के. मध्ये आलो आणि सध्या लंडनच्या जवळ काम करत आहे. मनोविकाराचे शिक्षण घेत असताना भारत आणि पाश्चात्य देशातील मानसिक आरोग्यासंबंधातील तौलनिक अभ्यास हा एक महत्त्वाचा भाग होता. पाश्चात्य देशात अनेक गोष्टी भारतापेक्षा उजव्या असण्याचा जसा समज आहे तसा मात्र तो मानसिक आरोग्याबाबत सरसकट म्हणता येणार नाही. अर्थात काही गोष्टी इथे चांगल्या आहेत तर काही गोष्टी आपल्या देशात चांगल्या आहेत. या विषयावरील हा थोडा अनुभावातून आलेला आणि थोडा संशोधनाचा आधार घेत लिहिलेला लेख. मनोविकारांच्या उपचारांचे तीन घटक आहेत – बायो-सायको-सोशियल – अर्थात जैविक (औषधे, इंजेक्शन, ई.सी.टी. इत्यादी), मानसिक (समुपदेशन, मानसोपचार किंवा टॉकिंग थेरपी) आणि सामाजिक (कुटुंब, मित्रपरिवार, सामाजिक सहभाग, शिक्षण किंवा व्यवसाय). पाश्चात्य देशात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता अधिक आहे. लोकांमध्ये मानसिक समस्या आणि विकार यांचा स्वीकार अधिक आहे. तसेच त्यासाठी जैविक आणि मानसिक उपचार घेण्याकडे लोकांचा कल अधिक असतो. त्याचबरोबर सामाजिक उपाययोजना आणि सेवा पुरवू शकणाऱ्या स्वास्थ्यसेवा आणि संस्था अधिक आहेत. आर्थिक तरतूदी आहेत. मनोसामाजिक कार्यकर्त्यांची उपलब्धता आहे. मनोरुग्णांना योग्य उपचार, मार्गदर्शन आणि योग्य वागणूक मिळावी, यासाठी पोलीसयंत्रणा, आरोग्ययंत्रणा, आणि इतर सामाजिक यंत्रणांच्या कर्मचाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण तसेच या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याची धोरणात्मक तरतूद आणि बंधन आहे तसेच त्याची अंमलबजावणी आहे. त्यामुळे मनोरुग्णाभोवती त्याला आधार देणाऱ्या यंत्रणांचे एक वर्तुळ तयार होऊ शकते. आणि व्यक्तीच्या पुनर्वसनाची वाट सुकर होते . दुसरीकडे पाश्चात्य देशातील समाज हा अधिक व्यक्तिवादी आहे. कुटुंब व्यवस्था घट्ट नसल्याने स्वातंत्र्य अधिक असण्याबरोबरच कुटुंब विघटनाचे प्रमाण देखील अधिक आहे. मुलांसाठी आईवडील विलग किंवा घटस्फोटित असण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मनो-सामाजिक उपायासाठी गरजेच्या असणाऱ्या कौटुंबिक आधाराचा तुलनेने अभाव आहे. मनोरुग्ण व्यक्तीच्या प्रसंगी विक्षिप्त वर्तणुकीला मित्रपरिवारात, कुटुंबात स्वीकारण्याचे किंवा सामावून घेण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच अनेक यंत्रणा उपलब्ध असल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून राहण्याचे प्रमाण अधिक आहे. शासकीय आरोग्यसेवा मोफत असली तरी स्तरानुसार आणि विशिष्ट पद्धतीने काम करते. त्यामुळे रुग्ण मानसोपचार विभागापर्यंत पोहोचायला वेळ लागतो. बऱ्याचदा टोकाचे पाऊल उचले पर्यंत प्रतीक्षा यादीत रुग्णाचे नाव पुढे सरकत नाही. आणि खाजगी वैद्यकीय सेवा प्रचंड महागड्या आहेत. आता आपल्याकडील व्यवस्थेबाबत बोलूयात. आपल्या देशात बऱ्याच सकारात्मक गोष्टी हळू हळू वाढत आहेत. भारतात गेल्या काही वर्षात स्वयंसेवी संस्था आणि टेली-कौन्सेलिंगच्या माध्यमातून चांगले परीणाम दिसू लागले आहेत. सर्वसाधारण मानसिक आरोग्य सेवा ‘तज्ज्ञ’केंद्रित न ठेवता अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी लोक आणि संस्था, सामाजिक कार्यकर्ते, इत्यादींच्या सहकार्याने उत्तरोत्तर चांगली होत आहे. तसेच शासकीय आणि खाजगी तज्ज्ञ उपचार आणि सेवा सहज उपलब्ध आहेत. शिवाय खागजी वैद्यकीय सेवा या तितक्या महागही नाहीत. असे असले तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे हे ही तितकेच खरे. उदाहरणार्थ मानसिक स्वास्थ्याबाबत जागरूकता आणि मानसिक समस्या आणि विकारांचे निदान व उपचार यांचा सहज स्वीकार अजून चांगले होणे गरजेचे आहे. विविध यंत्रणांतील समन्वय हा अपवाद म्हणून पाहायला मिळतो, तो तसा नको असून त्यांच्या कार्यपद्धतीचा एक भागच असायला हवा. आर्थिक तरतूद तर हवीच आहे. मेंटल हेल्थ केअर ऍक्ट २०१७, मानसिक आरोग्य कार्यक्रम इत्यादी अनेक उत्तम शासकीय आणि कायदेशीर गोष्टींची तरतूद होत आहे, परंतु त्याची अंमलबजावणी सातत्याने, सहजतेने, आणि एकसमान होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वच स्तरातून एक प्रबळ ईच्छाशक्ती आवश्यक आहे. त्यातील यश हे विशिष्ट व्यक्ती किंवा अधिकाऱ्यांच्या प्रेरणेपेक्षा सिस्टिमचा भाग म्हणून अपेक्षित असावे. अर्थात या सगळ्याकडे आपल्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातूनही पाहायला हवेच. या सगळ्या मर्यादा असूनही काही आश्चर्यकारक पण सुखद अशा गोष्टी समोर आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अभ्यासानुसार भारतात ५ वर्षानंतर स्किजोफ्रेनिया रुग्णांच्या ४२% प्रकरणांत सर्वोत्तम परिणाम दिसून आले, तर विकसीत देशांत ही संख्या फक्त १० ते १७% होती. भारतासारख्या विकसनशील देशात या विकाराच्या रुग्णांचे पुनर्वसन आणि स्वीकार अधिक चांगले होते हे निदर्शनास आले. एका अभ्यासानुसार ब्रिटन मधील भारतीय वंशाच्या मुलांमध्ये मानसिक समस्यांचे प्रमाण हे ब्रिटिश किंवा इतर गोऱ्या मुलांच्या तुलनेत कमी आहे. याचे कारण आपली सामाजिक संरचना असावी असा त्यांचा अंदाज होता. आपल्याकडे समूह-भावना अधिक आहे. एकत्र कुटुंब पद्धत आता अगदी पूर्वीसारखी नसली तर एका वेगळ्या स्वरूपात का होईना पण टिकून आहे, जसे विभक्त राहून वारंवार येणेजाणे असणे, संबंध ठेवणे इ. नात्यांची वीण अधिक घट्ट आहे. त्यामुळे एकमेकाला धरून ठेवणे, सामावून घेणे हे अपेक्षित असते. व्यक्तीला भावनिक आधार, संवाद, आणि सुरक्षितता यातून मिळते. मनोरुग्णांच्या बाबतीतही हे होत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम रोगमुक्ती आणि पुनर्वसन यावर अधिक होतो. कुटूंब व्यवस्था घट्ट आहे. पारंपरिक मूल्ये आणि अध्यात्मिकता आहे. कर्त्यव्य म्हणून असेल, जबाबदारीपूर्वक असेल किंवा यंत्रणांचा अभाव असल्याने असेल, पण कुटुंबातील वृद्ध किंवा आजारी व्यक्तीची देखभाल आणि काळजी घेण्याचे प्रमाण पाश्चात्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे अधिक आहे. रुग्णाच्या बरे होण्यात या सगळ्याचा एक निश्चित सकारत्मक परिणाम दिसून येतो. तुलनेने भक्कम अश्या नात्यातील नियमांमुळे आणि बंधनामुळे वर्तणुकीला एक सकारात्मक चाप बसतो. मुलांच्या वाढीसाठी एक स्थिर कुटुंब असण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यांना आदर्श घालून देण्यात मोलाची भूमिका असणाऱ्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्ती ह्या सारख्या बदलत नाहीत, त्यात सातत्य असते. आपल्या देशाची आणि समाजाची ही सारी बलस्थाने आहेत. ती अधिक सबळ करूयात. काळाबरोबर कराव्या लागणाऱ्या बदलांचा स्वीकार करूयात. मानसिक आजार म्हणजे कलंक असण्याच्या विचाराला पूर्णपणे तिलांजली देऊ यात. अंधश्रद्धांना खतपाणी न घालता, स्थानिक भावना आणि समजुतींचा सन्मान राखत, त्यांचा जमेल तिथे योग्य वापर करून, वैज्ञानिक उपाययोजनांचा अवलंब अधिक प्रमाणात करूयात. धन्यवाद. डॉ. अभिजीत कारेगांवकर, मनोविकार तज्ज्ञ, वेलीन गार्डन सिटी, यू. के. (03/09/2025)

Uncategorized

स्वभावदोष

स्वभावदोष प्रत्येक व्यक्तीचे एक विशिष्ट व्यक्तिमत्व असते. या व्यक्तिमत्वामध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे स्वभाव गुण सगळ्यांमध्येच दिसून येतात. परंतु काहींच्या बाबतीत मात्र हे गुण एका मर्यादे पलीकडे जाऊन त्रासदायक ठरतात. त्यांना या आपल्या गुणांबद्दल कळतं किंवा काही लोकांना कळत देखील नाही. परंतु सभोवतालच्या लोकांना मात्र त्यांचे हे स्वभाव गुण, विचार, भावना, वर्तणूक इतरांपेक्षा खूप वेगळे आणि विकृत जाणवतात. स्वभावाला औषध नाही असा ठाम समज आपल्या समाजात दिसून येतो. परंतु एखाद्याचा स्वभाव दोष किंवा विकृत स्वभाव गुणांमुळे इतर लोक त्रासलेले असतात, त्यावेळी मानसोपचार तज्ञांची मदत उपयोगी पडू शकते. सर्वसामान्यपणे दहा ते वीस टक्के लोकांमध्ये कुठल्यातरी प्रकारचा स्वभाव दोष दिसून येतो. अनुवंशिकता, जन्मत: मिळणारे स्वभाव गुण, सभोवतालच्या व्यक्तींचे वर्तन, एकमेकांसोबत घडणारा व्यवहार, चहूबाजूंनी मिळणारे अनुभव, शिक्षण, वाचन, संस्कार इत्यादी अनेक घटक आपला स्वभाव- व्यक्तिमत्व घडवण्यात मोठी भूमिका निभावतात. काही मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे व्यक्तिमत्व दोषाचे मूल्यमापन करून निदान करणे सोपे जाते. एखाद्या व्यक्तीमध्ये एकाहून अधिक स्वभावदोष देखील आढळू शकतात. लहानपणापासून स्वभावातील विकृत गुण हळूहळू दिसत असले तरी साधारणतः या मनोविकाराचे निदान वयाच्या 18 वर्षानंतर केले जाते. शास्त्रीय पद्धतीने स्वभाव दोष हे साधारणतः ए, बी आणि सी अशा तीन गटांमध्ये वर्गीकरण केलेले आहेत. स्किझोइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर. अशा लोकांना साधारणपणे आपल्या समाजामध्ये अबोल, एकलकोंडे असे म्हटले जाते. या स्वभावदोषाचे लोक समाज संबंधांपासून अलिप्त राहतात आणि जवळच्या नातलगांमध्ये असताना फारच सीमित भावनिक हावभाव दर्शवितात. त्यांची कुणाशीही वैयक्तिक घट्ट संबंध, जवळीक किंवा सलगी करण्याची मनात इच्छा नसते. तसे सौख्य जुळविण्याची संधी चालून आली तरी त्याबद्दल हे लोक बेफिकीर असतात. कुटुंबाचा आणि समाजाचा भाग असल्यातून त्यांना काही समाधान मिळत नाही. मित्रमंडळी किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत राहण्यापेक्षा त्यांना एकटंच राहणं जास्त पसंत पडतं. सतत मोबाईल मध्ये डोकं खूपसून बसणे, शब्दकोडे सोडवणे, संगणकीय खेळ, वाचन इत्यादी आणि जेथे इतरांचा फारसा सहभाग नसेल अशा तांत्रिक व कल्पनात्मक छंद व कार्यात ते मग्न असतात. ते कुणाला भेटत नाही किंवा कोणी त्यांना भेटायला येत नाही, नातलगांच्या आग्रहाखातर लग्न केले तरी वैवाहिक जीवनातही ते एकलकोंडेच व उदासीन दिसतात, त्यांची कोणी स्तुती किंवा टीका केली तरी देखील काहीही फरक पडत नाही. इतर लोकांचे आपल्याबद्दल काय मत आहे याची देखील त्यांना फिकर नसते. सभोवताली घडणाऱ्या गुढ मार्मिक कुठल्याही घटनांबद्दल त्यांना काही घेणेदेणे नसते, त्यावर ते काही प्रतिक्रिया देखील दाखवत नाहीत. इतर लोक त्यांना मक्ख, एकदम थंड स्वभावाचे व त्यांच्या नाकावरील माशी देखील उडत नाही असे म्हणतात. स्किझोइड  व्यक्तिमत्व असलेले लोक कधीतरी थोडेसे हास्य प्रकट करतात किंवा फक्त मान डोलावतात. समोरून कोणी डिचवलं, थट्टा मस्करी केली तरी देखील त्यांना क्रोध, आनंद अशा भावना उफाळून दिसत नाहीत. जीवनातील प्रतिकूल परिस्थितीतही ते निष्क्रिय राहतात. परंतु एकट्यानेच करण्याचे काम व्यवहार ते चांगल्या प्रकारे करू शकतात. तणावजन्य परिस्थितीमध्ये भावनिक तोल सांभाळता न आल्याने थोड्या काळासाठी ते भ्रमिष्ट होऊ शकतात. स्कीझोईड स्वभावदोष हा मतीभ्रम किंवा स्किझोफ्रेनिया अशा मनोविकारांचे पूर्व संकेत वा सूचना ठरू शकतो. एकलकोंडा लोकांना औदासिन्य आजार व इतर स्वभाव दोषही जडू शकतात.  साधारणतः जनसामान्यात दोन ते चार टक्के, प्रामुख्याने पुरुषांमध्ये संशयी स्वभाव दोष किंवा प्यारानोइड पर्सनॅलिटी डिसऑर्डर दिसून येतो. या विकृत स्वभावामध्ये व्यक्तीला सतत इतरांबद्दल संशय, अविश्वास जाणवतो आणि इतरांचे हेतू त्यांना नेहमी द्वेष पूर्ण वाटतात. लोक आपला गैरफायदा घेतात, फसवतात, लबाडी करतात, इजा पोहोचवतात असे यांना वाटत असते. पुरावा नसताना देखील अशा बाबी ते सत्यच मानतात. कधीही थोड्याशा किंवा काहीही खाणाखुणा नसताना लोक आपल्या विरुद्ध कटकारस्थान करतात, आपल्यावर हल्ला करतील असा संशय देखील त्यांना जाणवतो. संशयी व्यक्तिमत्त्वाचे लोकांना नेहमीच असे वाटते की दुसऱ्या लोकांनी त्यांना खोलवर दृढ इजा केलेली आहे. मनात मित्र सहकाऱ्यांच्या निष्ठा विश्वासाबद्दल असमर्थनीय शंका कुशंकांनी घर केलेले असते. त्यांच्या दृष्टीने आढळलेली इतरांची थोडीशी चूक त्यांच्या मानलेल्या गृहीत गोष्टीला आधार देते. त्यांना ज्यावर विश्वास नाही अशा एखाद्याने निष्ठा दाखवल्यास ते आश्चर्यचकित होतात. एखाद्या संकटात सापडल्यास मित्र व आप्त मंडळी एकतर आपली खिल्ली उडवतील, टीका करतील वा दुर्लक्षच करतील असे ते अपेक्षित धरतात. इतरांशी जवळीक साधण्यास व विश्वासाने काही सांगण्यास ते नाखूष असतात, कारण अशी माहिती त्यांच्या विरुद्ध वापरली जाईल अशी भीती असते. इतरांशी काही घेणेदेणे नाही असे म्हणून वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे देणे टाळतात. सौम्य कनवाळू शेरा वा घटनांचा ते धमकी वजा छुपा उलट अर्थ लावतात. जसे छोट्याशा चुकीचा हेतू पुरस्सर केलेला कट वा प्रासंगिक थट्टा मस्करीचा गंभीर चारित्र्यावरील घणघात समजतात. स्तुती प्रशंसेचा चुकीचा अर्थ काढतात, जसे प्रगतीबद्दल स्तुती केल्यास स्वार्थीपणाबद्दलच टीका वाटते, कोणी मदतीचा हात पुढे केल्यास आपण स्वतः अपुरे पडत असल्याची टीका होते असे वाटते. इतरांबद्दल नेहमी असूया, द्वेष वाटतो. त्यांच्या दृष्टीने इतरांनी केलेल्या अपमान आणि नुकसानाबद्दल क्षमा करण्यास ते कधीही तयार होत नाही. शुल्लक अनादर त्यांच्या मनात भयंकर शत्रुत्व निर्माण करतो आणि अशा विरोधी भावना दीर्घकाळ मनात रुतून बसतात. इतरांच्या अपायकारक हेतूंबद्दल ते सतत सावध सतर्क असतात, वाटलेल्या अपमानाचा बदला ते संधी न दवडतात ताबडतोब आक्रोश – रागाने प्रतिहल्ला चढवत व्यक्त करतात. ते विकृतपणे मत्सरी असतात, पुराव्या अभावी आयुष्याच्या जोडीदाराच्या चरित्रावर संशय घेतात, त्यासाठी व्यर्थ शिल्लक पुरावे गोळा करतात, आंतरिक सलगी व्यवस्थित राहून विश्वासघात होऊ नये या भीतीने ते जोडीदारावर पुरेपूर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी नजर ठेवून ते वारंवार जोडीदार कुठे आहे, काय करतोय असे चरित्राबद्दल प्रश्न विचारून भंडावून सोडतात.  असा संशयी स्वभाव दोष असणाऱ्या लोकांसोबत पटणे कठीण असते व त्यांच्याशी जवळचे नातेसंबंध टिकवण्यात अनेक समस्या उत्पन्न होतात. राजरोसपणे वादविवाद, सततच्या तक्रारी आणि रागाने एकटे, शांत राहून त्यांचा अतिजास्त संशय आणि वैरभाव दिसून येतो. संभाव्य धोक्याबद्दल नेहमी अतिदक्ष असल्याने ते सावधतेने गुप्त अविर्भावात वेगळेच वागतात. ज्यामुळे मायाळू प्रेमळपण नसून ते भावनाशून्य आतल्या गाठीचे जाणवतात. सत्यवादी, समजदार व गंभीर वाटत असले तरी बहुतांशी त्यांच्या चेहेऱ्याचे हावभाव प्रामुख्याने सतत बदलणारे, हट्टी, दुराग्रही, मर्मभेदक, झोंबणारे दिसत असतात. त्यांच्या अशा स्वभावामुळे सभोवतालच्या लोकांची चिडचिड होते. स्कीझोटाईपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजेच विक्षिप्त स्वभाव विकृती. हा या शृंखलेतील तिसरा व्यक्तिमत्व गुणदोष. या प्रकारामध्ये व्यक्तीचे विचार आणि चेहऱ्यावरील हावभाव यामध्ये विक्षिप्तपणा दिसून येतो. बोटांशी काहीतरी चाळा करणे, कसलाचा गुरुमंत्र म्हणणे, वहीमध्ये काहीतरी मंत्र लिहीत बसणे, एखाद्या गोष्टीवर अनाठाई तक्रारी करणे, कोणावर विश्वास न ठेवणे, ग्रह तारे ज्योतिष यांच्यावर अनाठाई अतिविश्वास, उपवास जप मंत्र पूजाअर्चा अशा गोष्टींमध्ये भरपूर वेळ घालवणे, शुभ अशुभ बघत राहणे, स्वप्नांचा त्याच्याशी संबंध लावणे, चिडचिड करणे रागावणे, विक्षिप्त विचित्र आणि स्वमग्न असे हे व्यक्ती असतात. ते चिंतामग्न, संशयी, अविश्वासू, अंधश्रद्धाळू, स्वप्नाळू आणि आभासी विश्वात रमणारे असतात. इतर लोकांना ते रुक्ष, निरस व भावनाशून्य जाणवू शकतात. अवैज्ञानिक असे जादुई विचार करण्यात ते मग्न असतात. अशा स्वभावदोषाच्या व्यक्तींना उदासीनता, स्किझोफ्रेनिया, व्यसनाधीनता असल्या प्रकारचे मनोविकार होण्याची शक्यता इतरांपेक्षा अधिक प्रमाणात दिसून येते.  एकंदरीत स्वभावदोषांमध्ये अस्थिर भावना असलेला बॉर्डर लाईन स्वभावदोष सर्वाधिक प्रमाणात आढळून येतो. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये दुपटीने दिसणाऱ्या या प्रकारात

Uncategorized

Move Your Body, Lift Your Mind

Move Your Body, Lift Your Mind: How Exercise Boosts Mental Health Most people think of exercise as something you do to stay in shape, lose weight, or keep yourheart healthy. But here’s the real secret: the biggest benefits of moving your body often showup in your mind. Exercise is one of the most underrated tools for fighting stress, lifting mood,and keeping mental health strong. And the best part? It doesn’t take hours in the gym to feelthe difference.The Science of the Mood BoostIf you’ve ever noticed how a walk clears your head or how a workout leaves you calmerafterward, you’ve felt the brain-boosting effects of exercise. Physical activity triggers therelease of endorphins—the body’s natural “happy chemicals”—that instantly brighten yourmood.It also raises serotonin levels, which play a key role in stabilizing emotions, while loweringcortisol, the stress hormone that fuels anxiety and restlessness. Together, these changes helpreduce worry, improve sleep, and prevent energy crashes.There’s also a cognitive boost: exercise increases blood flow to the brain, improving focus,memory, and learning. And beyond the chemistry, there’s psychology—reaching smallfitness goals builds confidence, resilience, and a sense of accomplishment. Simple Ways to Get MovingThe World Health Organization recommends at least 150 minutes of moderate activity perweek—that’s just 30 minutes a day, five days a week. It can be as simple as a brisk walk,cycling, or even dancing in your living room.If you’re new to exercise, here are some tips to make it stick:• Start small: Begin with 10–15 minutes a day and gradually increase.• Set realistic goals: Focus on consistency, not perfection.• Pair it with routine: Walk after meals, stretch before bed, or do squats while waitingfor the kettle to boil.• Make it fun: Pick activities you enjoy so it feels less like a chore.• Buddy up: Exercising with a friend makes it social and keeps you accountable.Think of exercise as self-care for your brain as much as your body. It’s free, accessible, andproven to ease stress, boost confidence, and protect long-term mental health. So the next timelife feels heavy, remember: you don’t just have to think your way out of a bad mood—sometimes the most powerful therapy is moving your body. Dr. Devika Patil

Uncategorized

किशोरवयीन मुलांमधील मानसिक आरोग्य

किशोरवयीन मुलांमधील मानसिक आरोग्य पौगंडावस्था हा शारीरिक, भावनिक आणि मानसिक विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे. किशोरावस्था म्हणजे मेंदूच्या जलद विकासाचा काळ. हा काळ उत्साह, बदल आणि आव्हानांनी भरलेला असतो. किशोरवयीन मुलांसाठी मानसिक आरोग्य विशेषतः नाजूक असते. हार्मोन्समधील बदलामुळे होणारे भावनिक चढ-उतार, शैक्षणिक दबाव, सोशल मीडियाचा प्रभाव आणि नातेसंबंधांतील गुंतागुंत यामुळे या वयात ताण, चिंता, नैराश्य आणि इतर मानसिक समस्या उद्भवू शकतात. जागतिक स्तरावर 10 ते 19 वयोगटातील सुमारे प्रत्येक 7 पैकी 1 किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी मानसिक आजारांनी प्रभावित होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, आत्महत्या ही तरुणांमध्ये मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. भारतातील एका अभ्यासात असे दिसून आले आहे की सुमारे 15% किशोरवयीन मुले मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत. किशोरवयीन मुलांमधील मानसिक आजार        चिंता विकार             किशोरवयीन मुलांमध्ये चिंता विकार हा सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे.            लक्षणे: सततची चिंता किंवा भीती लक्ष केंद्रित करण्यात अडचण चिडचिडेपणा डोकेदुखी, पोटदुखी किंवा छातीत धडधड होणे          नैराश्य                नैराश्य म्हणजे सतत निराशेची भावना.               लक्षणे: अपराधीपणाची भावना छंद किंवा सामाजिक उपक्रमांमध्ये रस कमी होणे वारंवार थकवा जाणवणे कमी किंवा जास्त झोप येणे भूक कमी किंवा जास्त लागणे आत्महत्येचे विचार येणे किंवा स्वत:ला इजा पोहोचवण्याची प्रवृत्ती  अटेंशन-डेफिसिट/हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर (ADHD) एडीएचडी हा विकार प्रामुख्याने बालपणात सुरू होतो आणि पौगंडावस्थेतून प्रौढत्वापर्यंत चालू राहू शकतो. लक्षणे: कामावर किंवा अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्यात अडचण येणे अतिसक्रियता (स्थिर बसण्यात अडचण) परिणाम:एडीएचडीमुळे किशोरवयीन मुलांच्या शालेय जीवनावर, नातेसंबंधांवर आणि आत्मसन्मानावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.  खाणे विकार पौगंडावस्थेत शरीराच्या प्रतिमेबद्दलची चिंता ही मोठी समस्या ठरते.“मी स्वत:च्या किंवा समाजाच्या नजरेत कसा दिसतो?” हा प्रश्न मुलांना महत्त्वाचा वाटू लागतो. वजन, उंची, केसांची शैली, कपडे याबद्दल चिंता वाढते.यामुळे आत्मकेंद्रीपणा वाढतो आणि कधी कधी नैराश्य व खाण्याचे विकार निर्माण होऊ शकतात. प्रकार: एनोरेक्सिया नर्वोसा: वजन वाढण्याची तीव्र भीती, ज्यामुळे अन्नाचे सेवन खूप कमी होते. बुलिमिया नर्वोसा: खूप अन्न खाल्ल्यानंतर जबरदस्ती उलट्या करणे किंवा जास्त व्यायाम करणे. परिणाम:उपचार न केल्यास गंभीर शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. पोस्ट-ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) मानसिक आघात किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम करू शकतो.अपघात, छळ, गैरवर्तन अशा आघातजन्य घटना अनुभवल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर PTSD होऊ शकतो. लक्षणे: घटनेबद्दल सतत आठवणी किंवा दुःस्वप्न येणे त्या घटनेची आठवण करून देणाऱ्या ठिकाणे किंवा गोष्टी टाळणे भावनिक असंवेदनशीलता झोपेच्या समस्या अचानक राग येणे  व्यसनाधीनता  काही किशोरवयीन मुले मानसिक समस्या, समवयस्कांचा दबाव किंवा कठीण भावनांशी सामना करण्यासाठी धूम्रपान, ड्रग्ज (गांजा, एम.डी.) आणि अल्कोहोलचा वापर करू लागतात.या पदार्थांचा गैरवापर केल्याने त्याचे व्यसन लागते आणि त्याचा नकारात्मक परिणाम होतो:  मासिक पाळीपूर्व सिंड्रोम (PMS) मुलींमध्ये मासिक पाळी येण्याच्या १ ते २ आठवडे आधी काही मानसिक आणि शारीरिक लक्षणे दिसू शकतात. मानसिक आरोग्य विकारांकडे दुर्लक्ष का केले जाते? कलंक: मानसिक आजारांना अनेकदा कलंकित केले जाते. त्यामुळे किशोरांना त्याबद्दल बोलताना लाज किंवा संकोच वाटतो. जागरूकतेचा अभाव: पालक, शिक्षक आणि स्वतः किशोरवयीन मुलांनाही मानसिक आजारांची लक्षणे ओळखता येत नाहीत. गोंधळात टाकणारी लक्षणे: चिडचिडेपणा किंवा मूड बदल ही लक्षणे अनेकदा “सामान्य किशोरवयीन वर्तन” म्हणून दुर्लक्षित केली जातात. किशोरांना दिला जाणारा आधार मोकळा संवाद: मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे चर्चा करण्यास प्रोत्साहन द्या. शिक्षण: स्वतःला आणि इतरांना मानसिक आरोग्याबद्दल शिक्षित करा, म्हणजे योग्य आधार देता येईल. व्यावसायिक मदत: जर एखादा किशोर मानसिक आरोग्याशी झुंजताना दिसला, तर त्याला समुपदेशन किंवा आवश्यकतेनुसार औषधोपचार घेण्यासाठी प्रोत्साहित करा. निरोगी सवयी: पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. सोशल मीडिया नियंत्रण: सोशल मीडियामुळे चिंता, नैराश्य आणि शरीर प्रतिमेबाबत समस्या वाढू शकतात. त्यामुळे किशोरांना सोशल मीडियापासून वेळोवेळी ब्रेक घेण्यासाठी प्रोत्साहन द्या आणि वापर मर्यादित ठेवा. आधार: सातत्यपूर्ण पाठबळ, प्रोत्साहन आणि सुरक्षित वातावरण दिल्यास किशोरांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो. किशोरवयात चढ-उतार होणे सामान्य आहे, पण चिंता, नैराश्य किंवा इतर मानसिक आजारांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.लवकर निदान, कौटुंबिक आधार आणि व्यावसायिक मदतीमुळे बहुतेक किशोर बरे होऊन निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगू शकतात. किशोरवयात चढ-उतार होणे सामान्य आहे, पण चिंता, नैराश्य किंवा इतर मानसिक आजारांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.लवकर निदान, कौटुंबिक आधार आणि व्यावसायिक मदतीमुळे बहुतेक किशोर बरे होऊन निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगू शकतात.

Scroll to Top